अर्थाचा जहरी तीर-
असा गंभीर शब्द कवितेचा;
प्रतिभेचा नाजुक स्पर्श,
कोवळा हर्ष शब्द कवितेचा!

Friday 27 November 2009

माझी कविता ६

मी स्वप्न तुझे प्रेमाचे गुलजार उधळले होते
तू गेल्यावरती मग का हे रक्त उसळले होते?

तू गेल्यावरती आले मज गंध प्रेमकुसुमांचे
कळले न मला मी केव्हा गजरे चुरगळले होते!

माझाच वेगळा रंग मी मिरवित होतो तेव्हा
पण रंग तुझे अन् माझे केव्हाच मिसळले होते!

मी अंगावरच्या ज़खमा कुरवाळित बसलो होतो
तेव्हाच ज़ख्म हृदयाचे अपरोक्ष चिघळले होते!

तू गेल्यावरती दिधला मी दोष तुझ्या असण्याला
अस्तित्व तुझे माझ्यात तेव्हा विरघळले होते!

2 comments:

Kedar said...

रचना सुरेखच आहे !!
एक प्रतिक्रिया ...
सहा जाता है जख्मो को.... सेहलाया नही जाता .
कीतना भी चाहे भुलाना उन्हे ... मगर भुलाया नही जाता..
मजा आता है ऐसे जख्म सहने मे....
ईन जख्मो का दर्द.... बयां होता है आंखों से... मगर जुबां से केहलाया नही जाता .... !!

Rutwik said...

वा:वा:! क्या खूब कही!

© Rutwik Phatak
all rights reserved