अर्थाचा जहरी तीर-
असा गंभीर शब्द कवितेचा;
प्रतिभेचा नाजुक स्पर्श,
कोवळा हर्ष शब्द कवितेचा!

Thursday 11 February 2010

एक नवीन कविता... माझीच.

सांगू नको रे माणसा अपुली घराणी
जाते पुन्हा ती माकडांपाशी कहाणी!

ऐशी न पूर्वी पाहिली मी जात होती
या चंदनाने शेवटी झिजल्या सहाणी!

गर्दीत होतो गाढवांच्या बैसलेला
माणूस होतो पण तरी ठरलो अडाणी!

आता ढगांचा राहिला कोठे भरोसा
या पावसाने आणले डोळ्यांत पाणी!

मी वास्तवाशी झुंजण्या गेलोच नाही
अमुच्याकडे खोट्या कथा, खोटीच गाणी!

या आमच्या गावात नाहित आडवाटा
(सा-याच जाती थेट घेऊनी स्मशानी!)


© Rutwik Phatak
all rights reserved