आयुष्य म्हणजे
आंधळ्यांची अधांतरी
शर्यत असते!
सगळेजण धावत असतात
तिन्ही मितींना
आणि आपल्यालाच आपला
आरंभबिंदू दिसत नसतो...
जाणवत असतात फक्त
इतरांच्या असंबद्ध हालचाली..
आणि कुठेतरी खोलवर
ऐकू येत असतात,
दूरवरून,
काळाच्या टापांचे आवाज.....
आयुष्य म्हणजे
आंधळ्यांची अधांतरी
शर्यत असते!
सगळेजण धावत असतात
तिन्ही मितींना
आणि तरीही शेवटी
सारेच पोचतात तिथे
जिथे दिशांचं काळाशी मीलन होतं...
मृत्यूपाशी!
No comments:
Post a Comment